Tuesday, July 29, 2008

APPRECIATION...

http://atelier-ad.blogspot.com/2008/05/minal-sonal-design.html


A SMALL DOSE OF APPRECIATION HELPS TO RAISE YOUR SPIRITS...N WHEN IT IS AS GENUINE AS THIS, WHERE SOMEONE WHO DOESNT KNOW YOU PRSONALLY BUT KNOWS YOU THROUGH YOUR WORK ITS STILL MORE OF PRIDE !!!

THANK YOU ATELIER-AD. KEEP UP THE GOOD JOB.

Sunday, July 27, 2008

ओली माती
शहारलेली
ओले अंतर
आसुसलेले

ओले मन
अस्‍वस्‍थ निरंतर
आतुरलेले
भेटीसाठी

गीत अनामिक
तुझेच माझ्‍या
तनात आहे
मनात आहे

भेट अचानक
तुझी नि माझी
झंकारत आहे
सूर नवा

आज आपला
मिळून बनू दे
ओला भिजला
रंग नवा

- सोनल मोडक

Friday, June 27, 2008

निसर्गाचा नियम

पावसाची सर
अंतरी काहूर
प्रीतीचा पाझर
दगडाला

वठलेला वृक्ष
जणू काळपुरुष
आशेचा धुमारा
त्‍यालाही फुटे

काडी काडी जोडून
चिमणीचे घर
पावसात बिचारे
गेले वाहून

इवलासा जीव
कसा कळवळे
तान्‍ह्‍या पिलासाठी
घर पुन्‍हा नवे

निसर्गाचा बघा
भला हा नियम
प्रलयातूनही
नवे जग साकारे..

- सोनल मोडक

मला मिळालेली एक प्रतिक्रिया,

सोनल,
थोडं स्पष्टं लिहीते आहे. कृपया राग मानू नये.
मी आणि माझे सोडून दुसर्‍या गोष्टींचा फारसा विचार नं करणे ही वृत्ती फार जास्त दिसून येते. या पोस्टमधे दिलेली कारणे ही फक्त त्या वृत्तीचे समर्थन करण्यासाठी दिली आहेत असे वाटते.
ब्लॉग लिहायला वेळ मिळतो नं? मग उचला की लेखणी दुसर्‍यांसाठी. नाही प्रत्यक्ष काही करता आलं तरी एव्हढं तर करता येईल?
उतू जाणारे दूध, बाळाची शू-शू वगैरे कारणे पुढे करण्याआधी साधना ताई, मंदा ताई आमटे यांची चरित्रे वाचा. त्यांनी कसे सांभाळले आपापले संसार आणि दुसर्‍यांचेही? त्यांनी ही कारणे दिली असती तर?
कथा,कविता,स्वानुभव यातून मराठी ब्लॉगकारांनी बाहेर पडावे असे हरेकृष्णाजींचे म्हणणे आहे ते अगदी योग्य आहे.

माझं मत...

कसंकाय,
पोस्‍ट लिहीली ती इतरांची मतं जाणून घेता यावीत म्‍हणूनच. त्‍यामुळे तुमचं मत वाचून राग यायचा प्रश्‍नंच नाही. तुम्‍ही म्‍हणता ते अगदी खरे आहे. आजच्‍या घडीला माणूस मतलबी बनत चालला आहे, आणि मीही त्‍याला अपवाद नाही. कारण मीही त्‍याच समाजाचा एक घटक आहे. साधना ताई, मंदा ताई आमटे यांची चरित्रे नाही वाचली मी अजून. पण त्‍यांच्‍या कामाबद्‍दल मला नक्‍कीच माहीती आहे आणि मी त्‍याबद्‍दल त्‍यांचा आदरही करते. पण म्‍हणूनच सगळ्‍यांनाच त्‍यांच्‍यासारखं बनता येईल किंवा सगळ्‍यांनीच त्‍यांनी जे आणि जसं केलं तेच आणि तसं करावं याला माझा विरोध आहे. प्रत्‍येक जागृक नागरिक आजच्‍या घडीला जितकं आणि जसं, जमेल तसं सामाजिक बंधन पार पाडतोच आहे हा माझा अनुभव आहे.
आणि मीही त्‍याला अपवाद नाही. किती मोठी पेक्षा किती मनापासून आणि कुठे मदत करतो ते जास्‍तं महत्‍वाचं.

सो, माझी एकच विनंती की चार ओळी वाचून माणसाबद्‍दल मतं बनवू नका. कारण लिखाण हे प्रत्‍येकाच्‍या मानसिकतेचं प्रतिबिंब असतं असं माझं मत आहे. त्‍यामुळे उद्‍याचं लिखाण आजच्‍या मतांपेक्षा वेगळंही असू शकतं. म्‍हणजेच कथा,कविता,स्वानुभव ह्‍याच्‍या पलिकडलंही !!!

- सोनल मोडक

Wednesday, June 25, 2008

कविता

तिची मी नेहमीच वाट पाहते
कधीतरी अवचित ती येते
अकल्‍पितातून अवचितपणे
अलवार, अलगद आठवणींच्‍या रुपाने...कविता उलगडते

-सोनल मोडक

हरेकृष्‍णजी,

आम्‍ही स्‍वत:च्‍याच व्‍यापात असे गुरफटून गेलोय अहो, की समाजाबद्‍दल विचार करायला वेळच नाही जणू...
विचार येतात, डोकं उत्तर शोधायचा छोटासा प्रयत्‍नं करतो, तेवढ्‍यात गँसवर ठेवलेलं दूध ऊतू जातं...
मग मला सांगा, समाजाचे प्रश्‍नं मोठे की शेगडी साफ करायची आवश्‍यता?
पेन घ्‍यावं काही लिहायला आणि तेव्‍हड्‍यात बाळाने शू-शू करावी...मग आली ना धावपळ !!

कळतंय हो सगळं...वळत नाहीय.
स्‍वत:च्‍याच पाशातून बाहेर डोकावून पाहील्‍याशिवाय गोष्‍टी दिसणारच नाहीयेत. पंचवार्षिक योजनेत आहे हा इश्‍यू आहे पाहिल्‍या नंबरवर...पण योजना पाचंच वर्षात संपते की नाही ते पहायचं.
गवर्नमेंटचा प्रोजेक्‍ट नाही हा, त्‍यामुळे वेळेत गोष्‍टी होण्‍याची शक्‍यताच जास्‍त, so... :) बघू !!

बुडबुडे

हवेत तरंग, पाण्‍यावर बुडबुडे उठतंच राहतात. छोटे छोटे बुडबुडे पाहायला मजा वाटते. हजारो बुडबुड्‍यांमधून मोजकेच मोठे होतात, बाकी बिचारे कधी येतात आणि कधी जातात काही हिशोब राहत नाही...चकचकीत पृष्‍ठभागावर सप्‍तरंग चमकतात. पाहणारा प्रत्‍येक जण मोहून जातो त्‍यांना बघून. जिवाच्‍या आकांताने पाठपुरावाही करतो त्‍यांचा..अंतापर्यंत...स्‍वत:च्‍या ! पण त्‍यानी मोठं होणं त्‍याच्‍या नशिबात नसतं लिहिलेलं..तो तसाच छोटा बुडबुडा म्‍हणूनच फुटुन जातो.
ठरवतं तरी कोण की कोणी मोठं व्‍हायचंय आणि कोणी छोटंच राहायचंय?
तुम्‍ही भलेही माराल हो हातपाय मोठं होण्‍यासाठी...पण सागळ्‍यांनाच यश मिळतं? कोण ठरवतं मग, की ह्‍याच्‍या प्रयत्‍नांना यश द्‍यायचं आणि ह्‍याला तसंच हातपाय मारत सोडून द्‍यायचं?

इथे "देव" हे उत्तर मला नक्‍कीच अपेक्षित नाही !!

पण खरं उत्तर तर मलाही माहित नाही अजून.
तुम्‍हाला माहीत असेल तर मला नक्‍की सांगा...

-सोनल मोडक

Monday, June 09, 2008

मला काय हवंय?

पैसा : हो! निश्‍चितच त्‍याशिवाय मन:शांती मिळणं कठीण. मला कोणी टाटा-बिर्ला नाही व्‍हायचंय.
पण कधीही मनात आलं (माझ्‍या किंवा माझ्‍या जवळच्‍यांच्‍या) की काहीही घेता यावं.
कोणी कधी मदत मागायला आल्‍यावर पैसे नाहीत ह्‍या कारणाने नाही म्‍हणायला लागू नये. एव्‍हडा पैसा तरी हवा.
नक्‍कीच मेहनतीने कमावलेला, जेणेकरुन रात्रीची स्‍वस्‍थ झोपही मिळावी.

शिस्‍त : त्‍याशिवाय माणसाची ultimate वाट लागू शकते. मी अनुभवते आहे ती स्‍थिती सध्‍या ! moody असणं ठीक आहे. त्‍यात काही वाईट आहे असं मला तरी नाही वाटत. पण आयुष्‍‍यात शिस्‍तं असणं फार आवश्‍यक.
ज्‍यामुळे day-to-day duties करता करताच फे-फे नाही होणार. energy loss नको त्‍या गोष्‍टीत आणि त्‍याच त्‍याच गोष्‍टींत नाही होणार. नवनवीन गोष्‍टी करायचा उत्‍साह शाबूत राहील. जिवंतपणा टिकून राहण्‍यासाठी नाविन्‍य अत्‍यावश्‍यक.
शिस्‍तीबरोबर स्‍वस्‍थ आणि निरोगी मन आणि शरीर आपसूकच येणार.

मन:स्‍वास्‍थ्‍य / समाधान / peace of mind : overall 100 पैकी जास्‍तीत जास्‍त कामं यशस्‍वी व्‍हायला लागली की छोटी छोटी अपयशं ( failures) मनावर तितकासा नकारात्‍मक परिणाम नाही करणार. त्‍यांना शांतपणे तोंड द्‍यायची शक्‍ती पण सहज मिळेल. भिजत घोंगडी न राहता यशस्‍वीपणे संकटातून बाहेर पडायचे मार्ग सूचत राहतील.

संकटं किंवा दु:ख नकोत असं मी कधीच नाही म्‍हणणार. पण त्‍यांना तोंड द्‍यायला, त्‍यातून बाहेर पडण्‍यासाठी विचार करायला शांतचित्त फार आवश्‍यक. मनासारखी माणसं भोवती असणं किंवा भोवती असलेल्‍या माणसांना आहेत तसं स्‍वीकारणं ह्‍यातूनच सर्व सोपं होणार. मात्र टाळी वाजणयासाठी दोन हात हवेत. नाहीतर दुसर्‍याला जोरदार फटकाच बसायचा.

चारचाकी वाहनाचं wheel balancing काही उगीचंच नाही करत. तोच नियम माणसालाही लागू पडतो.

कुठचंही नातं, अगदी कुठचंही नातं (आई-मुल, नवरा-बायको, भावंडं अगदी नोकर-मालक सुद्‍धा) नातं यशस्‍वी होण्‍यात दोन्‍ही बाजूंकडून एकसारखे प्रयत्‍नं होणं आवश्‍यक. नाहीतर त्‍यातल्‍यात्‍यात weak बाजूची फरपट आणि strong बाजूची गळचेपी होणं अनिवार्य. friction मधून झीज होते. नात्‍यातला ओलावाही नाहीसा होवू शकतो. एकदा त्‍या stage ला पोहोचल्‍यावर पुन्‍हा ओलावा निर्माण करण्‍याचे प्रयत्‍न माणसाचा कस खाऊन जातात. त्‍यासाठी वेळच्‍यावेळी मतं clear करणं आवश्‍यक.

एक बेसिक गरज : संवाद तेव्‍हाच होवू शकतो जेव्‍हा दोन व्‍यक्‍ती सम पातळीवर येतात आणि तेव्‍हाच त्‍या जे बोलतात ते एकमेकांपर्यंत पोचतं. मधल्‍यामधे हवेत विरलेल्‍या भवना आणि शब्‍द गैरसमजच वाढवतात. त्‍यामुळे स्‍पष्‍टं आणि स्‍वच्‍छं विचार आणि बरोबर शब्‍दांचा वापर फार आवश्‍यक. माणसाचे विचार दुसर्‍यापर्यंत पोहोचवण्‍यासाठी अजून तरी शब्‍द-संवाद हा एकच मार्ग वापरला जातो.
(telepathy वगैरे दूरच्‍या गोष्‍टी. मनच जिथे थार्‍यावर नसेल, तिथे स्‍वत:लाच स्‍वत:चे विचार ऐकू येणं मुश्‍कील
तर दुसर्‍यापर्यंत तुम्‍ही ते मन-to-मन काय पोहोचवणार.) असो !
त्‍यामुळे आपल्‍याला काय वाटते ते समोरच्‍याला माहित होणं अगदीच आवश्‍यक. जेव्‍हा माणसा-माणसांत भिंती उभ्‍या राहतात, भावनाच काय शब्‍दही दुसरीकडे पोहोचू शकत नाहीत मग !

बस्‍स ! फार काही नाही, इतकंच. ह्‍या सगळ्‍या कमवायच्‍याच गोष्‍टी आहेत म्‍हणा...free में कुछ भी नही मिलता.

माझ्‍या ह्‍या काही ईच्‍छा, फार मोठ्‍या नाहीत. पण त्‍यात involved sub-sections लिहायला घेतले तर मात्र फार मोठी गोची होईल सो लिखाण इथेच थांबवून विचारांना थोडी गति देते..काय !!

Wednesday, May 28, 2008

लिखाणाकडे तशी मी नकळत वळले. लहानपणापासून डायरी लिहायचे मी, नाही म्‍हणायला. पण त्‍यातले विचार अतिशय अंदाधुंद, विस्‍कळीत असायचे. मला नक्‍की काय म्‍हणायचंय ते मी चपखल अशा शब्‍दात कधीच मांडू शकले नाही. सुरु एकीकडून केले तर शेवट दुसरीकडेच कुठेतरी व्‍हायचा. मूळ मुद्‍दा हरवूनच जायचा. आणि नंतर वाचायला घेतले की मीच हरवून जायचे त्‍यात.

मनातली घुसमट बाहेर काढणं हा मुळ हेतु असायचा. कारण मी होते घुमी. कधी काही धडपणे न बोलणारी. लाजत, संकोचत, अडखळत काहीतरी बोलणारी. हजारो गंड मनात बाळगून, स्‍वत:ला जगापासुन लपवत जगणरी. बरं तसं असलंतरी मनात विचार तर चालूच. कोणाचं काही पटणार नाही, कोणाचं वागणंच खुपत राहणार. पण मोकळेपणाने बोलणं नाही कधी.

माझे विचार मी अजुनही स्‍पष्‍टपणे आणि नेमकेपणाने मांडू शकत नाही. माझी ही कायमचीच खंत राहील. इतरांचं स्‍वच्‍छ, परखड, to the point लिखाण वाचलं की मी अजुन किती पाण्‍यात आहे ह्‍याची सतत जाणीव होत राहते. तर असा माझा प्रवास. अखंड, निरंतन चालू रहावा हीच ईच्‍छा.

- सोनल मोडक

नाती

मनुष्‍य प्राणी ही समुहात वावारणारी जमात !! रक्‍ताची नाती निसर्ग न विचारता बहाल करतो.. आपण जसे मोठे होत जातो (वयानी बरं का) आपण आपली नवी नाती जोडत जातो. तसं पाहिलं तर जन्‍मभर पुरणारं कोणतंच नातं नाही... जितकी नवी नाती बनत जातात, तशीच जुनी तुटंत राहतात.. काही प्रत्‍यक्ष अंतरामुळे तर काही मनात पडत जाणर्‍या खोल खोल दरीमुळे. तरी आपल्‍याला माणसं जोडावीशी वाटतंच राहतात...निसर्गाचा नियमच आहे बहुतेक तो.

हर गली हर सडक बेशुमार आदमी
फिर भी तनहाईयोंका शिकार आदमी...


नाही का.. हा तर आपणा सगळ्‍यांचाच अनुभव.. अशा वेळेस आपली आपल्‍यालाच साथ उरते..
खटाळभर मित्र, मात्र आपल्‍या दु:खात आपणच आपले.. स्‍वत:च पडायचं, स्‍वत:च उठायचं आणि पुन्‍हा काहीच झालं नाही अशा आविर्भावात नव्‍याने चालायला लागायचं.
पुन्‍हा नवी दिशा, नवी आशा आणि नव्‍या ठेचा..
हां मात्र चेहर्‍यावर हासु कायम पाहिजे बरं !
का तर म्‍हणे आयुष्‍याचं ultimate ध्‍येय आनंदी असणं आहे.
कोणी ठरवलं हे?
असं नाही विचारायचं आपण.. आपण फक्‍तं आनंदाच्‍या दिशेने चालत रहायचं.
म्‍हणजे नक्‍की काय करायचं GOD only knows !

- सोनल मोडक

Friday, May 23, 2008

असंच..

मनातल्‍या भावनांचा रंग उतरतो कागदावर
सुंदर चित्र बनत जाते
मन भरुन येतं, डोळे वाहू लागतात
आणि शब्‍दही झिम्‍मा घालू लागतात
शब्‍दांची लड झरू लागते
आणि मनाच्‍या हिरवळीवर
आठवणींचे दवबिंदू जमू लागतात...
अलवार अलगद...!!

-सोनल मोडक

Thursday, May 22, 2008

ईच्‍छा

आता मी ठरवलंय
तिला बहरु द्‍यायचं
तिलाही हळुवार ऊमलू द्‍यायचं
तिच्‍याबरोबर आपणही फुलत जायचं

कितीदा मारलंय मी तिला आजवर
कधी कोणासाठी, तर कधी दबून
मनातल्‍या मनात तिचा
मी किती केलाय कोंडमारा

पण प्रत्‍येक वेळी तिचाच का द्‍यायचा बळी
दुसर्‍यांचा विचार करतांना स्‍वत:चा विचार कधी करायचा !!

म्‍हणून मी ठरवलंय...

मी अगदी शांत राहीन !

सहन होतंय तोपर्यंत
मी अगदी शांत राहीन
मनात खोलवर रुतलेलं दु:ख
आत आत दाबत राहीन..

आज ना उद्या होईल ठीक सारं
असा खोटा दिलासा मनाला देत राहीन
तेच तर करत आले आहे आजपर्यंत
रोजच स्वत:ला सांभाळत राहीन..

पण कुठेतरी खरंच थांबेल ना हे सारं?
किती दिवस..?
सहन होतंय तोपर्यंतच ना..
हरकत नाही, मी अगदी शांत राहीन !

come september...

Green day-wake me up when september ends...

Summer has come and passed
The innocent can never last
wake me up when september ends

like my fathers come to pass
seven years has gone so fast
wake me up when september ends

here comes the rain again
falling from the stars
drenched in my pain again
becoming who we are

as my memory rests
but never forgets what I lost
wake me up when september ends

summer has come and passed
the innocent can never last
wake me up when september ends

ring out the bells again
like we did when spring began
wake me up when september ends...

one more chance tonight !

well I didn't mean for this to go as far as it did..
and I didn't mean to get so close and share what we did..
and I didn't mean to fall in love, but I did..
and you didn't mean to love me back, but I know you did..


.....but what I wouldn't give to have one more chance tonight, one more chance tonight !

Tuesday, May 13, 2008

बलात्‍कार ही काय फक्‍तं शारीर क्रिया आहे? मला नाही वाटत तसं. जेव्‍हा एखाद्‍या मनाचा तोल ढळतो,
तेव्‍हा तिथेच पहिला बलात्‍कार झालेला असतो. मग घटते ती फक्‍तं क्रिया ! त्‍याची तर गणतीच नको. तुम्‍ही प्रामाणिक, सज्‍जन आहात म्‍हणजे नेमकं काय? जर तुमच्‍या मनात स्‍त्रिला पाहिल्‍यावर फक्‍तं वासनाच येते,
तर तुम्‍ही तसं काही प्रत्‍यक्ष केलं नाही म्‍हणून फक्‍तं प्रामाणिक ठरता का? मनात जर ती घटना घडून गेलेली असेल
तर तुमचा सभ्‍यपणा, प्रामाणिकपणा तो काय!देवानं एकट्‍या मनुष्‍यप्राण्‍याला मेंदू नावाचा एक अतिप्रगत असा अवयव बहाल केलाय. बाकी मन वगैरे
सगळं त्‍यानंतर आलेलं, त्‍याच मेंदूतून निर्माण झालेली एक संज्ञा...दाखवू शकता मला तुम्‍ही मन वेगळं काढून?
पण माणसाची आख्‍खी ओळख त्‍या मनावर बेतलेली असते. मग सगळे मनाचे खेळ म्‍हणायचे का!
आणि हो तर त्‍या मनाची शुचिता आहे कुठे हल्‍ली? मनावर तर ताबा राहिलाच नाहिये माणसाचा.
त्‍याला काय उपाय मग? प्रत्‍यक्ष कृती न करणारे भ्रष्‍टं आत्‍मे तर खुपच आहेत अवती भवती...त्‍यांचं काय करावं मग!

-सोनल मोडक
ती,
त्‍याच्‍यात आपलं सर्व अस्‍तित्‍वं हरवून बसलेली..
ऊन्‍हाळ्‍यात कोणासाठी तरी पूर्ण आटून जाणारी..
आपल्‍या देहातले दगड धोंडे माणसाच्‍या घरासाठी देउन टाकणारी..
दोन्‍ही तट सुपीक करत दुथडी भरुन वाहत राहणारी..
अनिश्‍चित क्षय होत होत वाढत राहणारी..
नदी..जणू गरती बाई...

तो,
याचं हे असं पूर्ण ओलं असूनही कोरडं राहणं..
लाटांच्‍या एक एक करुन अनेक हातांनी कवेत घेणं..
हवहवसं वाटतं त्‍याच्‍या सर्वस्‍वी स्‍वाधीन होणं..
अनुभवलं असेल भलेही त्‍याने अशा अनेक जणींना..
तरीही तो अतृप्‍तं, अभोगी, अथांग...योगी !!!

- सोनल मोडक

Thursday, May 08, 2008

मातीचं ऋण

एक होता हरी. हरी कुंभार. कुंभार कसला ८- ९ वर्षाचा लहानसा मुलगाच तो.
कुंभारपण वडलांकडून वारशाने मिळालेलं, तेव्हड्यापुरतंच. बाकी मातीत खेळायला कोणाला नाही आवडणार !
तसा खेळताखेळताच तोही मातीची भांडी बनवायला शिकला आणि वडलांना कामात मदत करू लागला.
मातीत हात माखायला लागले, हळू हळू कपडेही मातीतंच रंगायला लागले. हरी कुंभार, पुरा मातीमय झाला..

भांडी बनवायला माती उपसून उपसून जमिनीत तर खड्डा बनतंच होता, पण पोटाचा खड्डा भरायला काही त्याचा उपयोग होत नव्हता. पोटाचा खड्डा वाढतंच होता.
मातीमाय त्याचं आयुष्यं असं पुरतं घेरुन बसली.

आणि एक दिवस असा आला कि तोही त्या मातीचाच झाला. पोटाचा खड्डा उरलाच नाही न् जमिनीचा खड्डा हरीने भरुन काठला...

-सोनल मोडक

Monday, May 05, 2008

हे दोघं माझा उन्‍हाळा सौम्‍य करतात...

अमल...

अमलताश...

"मला मी"

"स्व‍च्‍छ्‍ं मोकळा विचार" करता येणं ही दैवी शक्‍ती असावी बहुधा. भोवतालचं, घराघरातलं आणि मनामनातलं वास्‍तव स्‍वस्‍थता नाही देत. आणि अशात "स्व‍च्‍छ्‍ं मोकळा विचार" करता येणं ह्‍यासारखं सुख नाही.

अस्‍वस्‍थ मनाला शांत करण्‍यासाठी बाहेरून दुसरं कोणी यायची गरज नाही.
गरज आहे आपणंच आपल्‍याला नीट ओळखण्‍याची आणि त्‍याहुनही जास्‍तं, आहोत तासे स्‍वीकारायची.
एकटेपणावर, कुणाची तरी सोबत हा उपाय असू नाही शकत. आपली सोबत आपल्‍यालाच आवडायला हवी.

प्रत्‍येकाच्‍या आयुष्‍यात एका ठराविक वळणावर नवरा/बायको च्‍या रुपात एक सोबत मिळालेलीच असते.
पण माणूस म्‍हणून जगतांना असं काहितरी सापडायला हवं, की ज्‍यायोगे "मला मी" पुरेशी ठरेन.

Friday, May 02, 2008

पाऊस...

उन्‍हाळा फार वाढलाय...नद्‍यांबरोबर मनातले शब्‍दही आटून गेलेत बहुतेक...
महिना उलटला साधे दोन शब्‍द नाही जुळलेत अजून...अंगाची आणि मनाचीही तलखी तलखी होतेय...
पहिल्‍या सरीची वाट पाहातेय...तो मातीचा सुगंध मनावर नक्‍कीच काहीतरी जादू करेल...
धो धो पाऊस कोसळेल. मनावरची धूळ धुतली जाईल...नवे रंग, नवे आकार, झाडांना नवे धुमार...निसर्गाचा नवा हुंकार...
ये रे लवकर, अशी परीक्षा नको पाहु !!!

तो येईल...लवकर नाही, खूप वाट पहायला लावेल आधी...काय मजा मिळते त्‍याला कळत नाही.
येईल...धो धो बरसेल...तप्‍तं मनं श्रांत होतील...
आणि मग एक अशी वेळ येईल की वाटू लागेल ह्‍याने आता थोडं थांबावं...थोडं सबूरीनं घ्‍यावं...
पण तो मागे हटणार नाही...वादळ उठवेल, सगळी उलथापालथ करुन मग नामानिराळा निघून जाईल...

मग पुन्‍हा तोच खेळ...वाट पहायचा...!!!

-सोनल मोडक

Friday, March 28, 2008

आठवण...

तुझी आठवण,
जशी वार्‍याची झुळुक
तळपत्‍‍या सूर्याखाली
सुखद शीतल सावली

तुझी आठवण,
जशी वेडी श्रावणसर
पाचूंच्‍‍या हिरव्‍‍या बनात
ओलेतं ऊन उबदार

तुझी आठवण,
वाळवंटातलं मृगजळ
आभसी मायावी
पळते क्षितिजापार

तुझी आठवण,
जसा रातराणीचा सुगंध
रात्रीच्‍या नीरव शांततेत
बेभान, मंत्रमुग्‍ध

तुझी आठवण,
जसं कुपीतलं अत्तर
कसं न्‌ केव्‍‍हा उडून जातं
पण भिनतो सुगंध नसानसात

तुझी आठवण,
दडवलेला खजिना
पडझड झाली वाड्‍याची
तरी जाईना आस

तुझी आठवण,
विष जहरी
आयुष्‍‍यं होतं बधीर
‍प्‍याला नको पुरे एकच घोट ...

- सोनल मोडक

Monday, March 24, 2008

आठवणी

आताशा मला हे काय होतं कळत नाही
चालावं म्‍हणता, काही केल्‍या पाऊल पुढे पडत नाही

अनंत जुन्‍या आठवणी मनाचा कोपरा सोडून
येऊन बसतात पृष्‍ठभागावर अडमुठ्‍यासारख्‍या हटून

विसरू म्‍हणता विसरत नाहीत, आठवणीच त्‍या
बंड करुन उठतात वैरीणी जणू दाही दिशा

मी मग माघार घेऊन स्‍वत:ला त्‍यांच्‍या स्‍वाधीन करते
आडवेळी मी मग अगम्‍यं स्‍वप्‍नांच्‍या अधीन होते...

- सोनल मोडक

Sunday, March 23, 2008

आपण सारे अभिमन्‍यू..

november 1999, pune.

आजच्‍या घडीला सरत्‍या शतकाच्‍या वळणावर एकूणच सर्वत्र गोंधळाची परिस्‍थिती आहे. आजचा अभिमन्‍यू त्‍याला अपवाद नाही. समाजात जसं एक गोंधळाचं वातावरण आहे, तसं ते अभिमन्‍यूच्‍या वैयक्‍तिक आयुष्‍यात सुद्‍धा आहे. त्‍याची नोकरी, त्‍याच्‍या सवयी, त्‍याच्‍या इच्‍छा आकांक्षा आणि भोवतालची रोजच्‍या संपर्कातली माणसं या सर्वात त्या‍ची कोंडी झालेली आहे. ज्‍याच्‍याकडे मन मोकळे करता येईल, जो खरा खरा मदतीचा हात पुढे करेल, अशा एका साथीदाराच्‍या तो शोधात आहे.

एकलेपणा आणि नैराश्‍य यातून बाहेर पडून त्‍याला आनंदाचे क्षण वेचायचे आहेत. त्‍यासाठी अनिश्‍चिततेच्‍या या चक्रव्‍यूहातून त्‍याची त्‍यालाच सुतका करुन घ्‍यायची आहे. त्‍याच्‍याकडे ह्‍याशिवाय दुसरा पर्याय नाहीय. परस्‍पर विरोधी गोष्‍टींनी भरलेल्‍या स्‍वत:च्‍या व्‍यक्‍तीमत्‍वाची त्‍याला जाणीव होणं आवश्‍यक आहे. सगळीकडे गोंगाट, गजबजाट आहे आणि त्‍यातूनच त्‍याला सगळ्‍यांशी संवाद साधायचा आहे. तमाम भौतिक गरजा पुरवणारं भोवतालचं जग, जे आत्‍मशक्‍तीचा, आत्‍मोन्‍नतीचा मार्ग दाखवू शकत नाही, अशा आजच्‍या जगाचाच तो एक भाग आहे. अशा ह्‍या गोंधळलेल्‍या अवस्‍थेत तो कधी निकरावर येत तर कधी स्‍वत:ला भिरकावून दिल्‍यासारखा जगत राहतोय। समाजाची आजची अवस्‍था अशीच झाली आहे। आणि अशा वेळी अभिमन्‍यू काय किंवा एकूणच समाज काय, नेमकं कुठल्‍या प्रकारचं भविष्‍य अपेक्षितो आहे, याचा शोध घेण्‍याची वेळ आता आली आहे. मला इथे एक गझल आठवते,

अपनी मर्जीसे कहां अपने सफर पर हम है,

रुख हवा का जिधरका है उधरके हम है॥

माझं हे मत वाचणार्‍या प्रत्‍येकाने यावर विचार करावा. मला असं वाटतं हे तर मी स्‍वत: जगत आलेय आजपर्यंतं. दरवेळी स्‍वत:ला जाणता- जाणता तपासून पाहत किंवा आसपासच्‍या वातावरणाशी जमवून घेत, स्‍वत:च्‍या मनाला न पटणार्‍या गोष्‍टी करतांना मी मझी स्‍वत:ची ओळखंच विसरुन बसते. पण ही गोष्‍टं तितकीच खरी की प्रत्‍येकालाच यात एखादातरी आशेचा किरण, एक दिशा मिळतेच. तो किरण मला मिळाला आहे...

नकारात्‍मक दृष्‍टीकोण पूर्णपणे बदलायचा प्रयत्‍नं करणार आहे. पण नव्‍याच्‍या शोधात जुने गमवायचा मूर्खपणा मी करणार नाहिये. तुम्‍हीसुद्‍धा लवकरच यावर विचार करा आणि वेळ हातातून जाउ देऊ नका। -

सोनल मोडक

मोहोळ

एखादी रात्र अशी येते
आठवणींचं काहुर माजवून जाते
मन होतं सैरभैर असं
वादळात सापडलेलं पाखरु जसं

- सोनल मोडक

Thursday, March 20, 2008

सावर

रे मना सावर आता
उंच तुझी भरारी
घाल पालथ्‍या दाही दिशा
पण ये परतोनी माघारी

देश परका न मिळेल थारा
अनोळखी सारे चेहरे
इवलेसे पण घर आपुले
तुझ्या वाटेकडे लागले डोळे...

- सोनल मोडक

Sunday, March 16, 2008

बंध

असे वाटते की
अशी सांज यावी
दुरावा स्‍वत:शी
तुझ्‍याशी तुटावा

गात्रांतून स्‍वच्‍छंदी अन्‌
अंतरात घुसमटलेला
पाऊस कधीतरी
बेफाम बरसावा

बंध रेशमी तुझ्‍यासवे
अलगद असे जुळावे
जसा फुलासवे सुगंध
जसा धुक्‍याचा गहिरा रंग...

- सोनल मोडक

Saturday, March 15, 2008

अमल हल्ली ह्या अबलख घोड्याशिवाय काही करत नाही ...

दिती दीदी ने दिलेलं सुंदर गिफ्ट ...

कार आणि अमल

11 months old he's now...amal

rang de basanti again...









चांदवा

सूर्य ढळला आली सांज
आकाशी चढे सोनेरी साज

दिवसावर करे रात चढाई
प्रकाश-काळोख करती लढाई

सूर्या सारखा सूर्यदेव तो
चंद्रराजाच्‍या हाती हारतो

येती चांदण्‍या आकाशी एकेकं
साजरी कराया शीतलं जीतं

रातराणी होते मनी हर्षितं
येणार हो तिचा चांदवा मितं...

- सोनल मोडक

बकुळ

हास्‍याच्‍या मागे दु:खाची लकेर
जशी काळ्‍या ढगाला सोनेरी किनार

हातावरच्‍या रेषांचा सगळा गुंता
गाठीवर गाठी मनी पडता

बघता बघता नाती पुसंट होतात
सुकलेल्‍या पाकळ्‍या गळून पडतात

बकुळीचा सुगंध खरा अविट
नि:श्‍चेतन तरी भरे आसमंती ...

- सोनल मोडक

Friday, March 14, 2008

वणवा

का आयुष्‍यात
भाग्‍याचा भरोसा नसतो
एका ग्रहाची करावी शांतं
तर दुसरा आडवा येतो

अशी कितीतरी नवीन नाती
दिवसागणिक बनत जातात
काही जखमा अगदी भरुन जातात
तर काही भळभळून वाहतात

असे काही प्रश्‍नं कसे अवघड बनतात
तर काही भूर्रकन सुटून जातात
वाटतो प्रत्‍येक क्षण भरभरुन जगावासा
वणव्‍यात पेटलेल्‍या लाकडासारखा,
आपला अंतं बघावासा...

- सोनल मोडक

Wednesday, March 12, 2008

स्‍पर्शाच्‍या पलीकडे तू
मनाच्‍या आरशातील प्रतिमा
आरपार शुद्‍धं निर्मळ...

तुझे अस्‍तित्‍वं अर्थाच्‍या परे
जरा उलगडू दे मला माझेही मन
अमूर्त अगम्‍यं दुर्गम...

- सोनल मोडक

आधारीत

तुझ्‍या वेदनेचे हुंकार मी
शोधू कुठे आणि कसे
हुंदक्‍यांनी आड वेळी
जाग डोळा येतसे...

वाहती थंड गार वारे
शिरशिरी आली पुन्‍हा
हात पाठीवरुन फिरला
वेदना तरी उरलीचं ना...

- सोनल मोडक

Tuesday, March 11, 2008

प्रश्‍नोत्तर...

प्रश्‍नं ..

झिजलेल्‍या वस्‍त्राला,
ठिगळ लावता येईल..
पण, विरलेल्‍या नात्‍यांना,
फाटलेल्‍या आभाळाला?
भेगाळलेल्‍या जमिनीला?
कसं रे?...
- सुषमा करंदीकर

उत्तर..

फँशन आहे ठिगळांची कपड्‍याला
नवीन नाती येतील जन्‍माला
ढगांची नक्षी रचू आकाशी
भेगांतून येइ नवे रोप वरती...

- सोनल मोडक

Thursday, March 06, 2008

बंड

बसले आज पुन्‍हा लिहायला
शब्‍दांनी पुकारले बंड
वाटले मनीचा सूर हरवला
जणू अंतरातील धग झाली थंड...

ऊन सावलीचा खेळ सारा हा
कधी श्रावण कधी वसंत
एकमेकांवर मात कराया
ऋतूंस मिळेना उसंत...

तरी पुन्‍हा पुन्‍हा तिकडेच पळे
जसे उनाड वासरू
मनं भिरभिरे वार्‍यासंगे रे
झाले जणू वेडे पाखरु...

अक्षराला जुळे एकेक अक्षरं
शब्‍दांचे पडति सडे
शब्‍दं आला मागे सूर घेवोनि
मनी गाणे उलगडे...

- सोनल मोडक

डोळ्‍यांत...

डोळ्‍यांत उतरले नभ आज
बरसले मेघ धुवांधार
सृष्‍टी ल्‍याली हिरवा साज
जागला मनी नवा उल्‍हास...

डोळ्‍यांत उतरले स्‍वप्‍नं नवे
मन झाले पाखरु आज
चांदणे मनीचे आज हवे
कुजबुजली मनी नवी गाज...

डोळ्‍यांत चमकला चंद्र आज
कलेकलेने तो उजळे
लख्‍खं चांदणे पुनवेचे ते
गर्विष्‍ठ रवीसही लाजवे...

- सोनल मोडक

Monday, February 25, 2008

सांज

आसवे उसवती धागे
गोधडी मनीची उघडे
खपली काळाची पडते
भरली जखम पुन्‍हा ओघळते

नात्‍यास नसे ते नावं
बिनपत्‍याचे ते गावं
डोळ्‍यातं हरवले भावं
धुके मनी साकळते

सांजसावली क्षितिजावरती
सागरा लागली ओहोटी
वाळूत उमटती रेषा
लाटा येवोनि पुसती

- सोनल मोडक

Saturday, February 23, 2008

मित्र

आपल्‍या निरर्थक बडबडीलासुद्‍धा patiently कान देणारा
वेळप्रसंगी कान धरुन मार्गावर आणणारा
पलिकडच्‍या किनार्‍यावर आपली वाट पाहणारा
छोटासा दिवा बनून आपली सोबत करणारा

रक्‍ताची नाती काय क्षणात तुटतात
मनाची नाती हळूहळू जुळतात
एकदा जुळली की आयुष्‍यभर फुलतात
अशीही काही आपली माणसं असतात

कुणीच आपलं नसतं
मग आपण कोणासाठी असतो
वेड्‍या मनाचं समाधान
बाकि इथे प्रत्‍येकजण एकटाच असतो

पाखरं येतात दाणा टिपून उडून जातात
क्षणभराचं नातं जोडून आठवणी सोडून जातात
विस्‍मरणात गेल्‍या तर त्‍या आठवणी कसल्‍या
बिचार्‍या आपली संगत करत राहतात

इथून दूर जाताना
अनेक वाटा माझ्‍या असतील
पावलापावलवर
आठवणी मात्रं तुझ्‍या असतील...

- सोनल मोडक

Thursday, February 21, 2008

अलिप्‍तं..

तळ गाठ एकदा
ये वरती निघोनि
तुझी तू नसशीलंच
असशील दुसरीच कुणी,

तसा तो मी
कित्‍येकदा गाठलाय
आणि वरही आलेय
पूर्‌णं कोरडी,

तरी हा दाह
चारी बाजूंनी वेढलेला
आता हा निखारा
नकोच विझायला...

- सोनल मोडक

राधा

तुझे ओठ गाती मुके गीत जेव्हा
तुझा शब्‍द भिडतो मनाच्या तळाशी
तुझा रंग अंगावरी सांडलेला
तुझा गंध भिनतो मनाच्या कळ्यांशी.....

दिले स्‍वप्‍नं गुलजार नाजुक भोळे
गुलाबी पहाटे गुलाबी क्षणांनी
कळी पाकळी उमलते मोहरुन
कळ्‍यांची फुले झाली स्‍वप्‍नील नयनी.....

बनी वाजवितो निळा कृष्‍णं वेणू
करी पैंजणे पायी अलवार रुणूझुणू
भुलू लागली ती झुलू लागली ती
प्रियाच्‍या सूरांनी बने बावरी ती.....

- सोनल मोडक

Friday, February 15, 2008

देव

अमलच्‍या बाललीलांबद्‍दल खूप काही लिहावं असं मला सारखं वाटंत राहतं,
पण शब्‍द गोळा करण्‍यात मी कमी पडतेय...अमल झपाट्‍याने मोठा होतोय.
काय लिहु आणि काय नको...तसं पाहिलं तर खूप काही आहे, पण...
हा पण कसा कुठून येतो देव जाणे.

इतका जिवंतपणा, ती विजिगिषा, सळसळता उत्‍साह...सगळं शब्‍दात पकडणं कठिणंच.

डोळ्‍यासमोर आहे ते त्‍याचं पहिलं वहिलं रुप. ते इवलेसे डोळे टकामका माझ्‍याकडे बघणारे.
त्‍यांना जाणीवही नसेल हा जो काही चेहरा दिसतोय, त्‍यावर हा जग जिंकल्या‍चा आनंद कुठूनसा आला असावा.
हिच आपली आई...आपण हिच्‍या पोटात पूर्ण नऊ महिने वाढलोय.
आपलं अस्‍तित्‍वं पूर्णतः हिच्‍या अस्‍तित्‍वावर बेतलेलं आहे.

इवलासा तो जीव...अबोध ‌‌‌. जग काय असतं तेही न पाहीलेला आणि त्‍याला नेलं माझ्‍यापासूनु मैलोन्‌मैल दूर.
आईचं दूधसुद्‍धा नाही प्‍यायला आणि हिरो निघाला गाडीमधून...एकटाच.
आहे खरा शूर सिपैया...आईशिवाय कुठून आणली ही ताकद त्‍याने.
अज्ञानाची हीच ती शक्‍ती काय. मग कशाला हवं ज्ञान...मनाला कमकुवत बनवायला.

कोण देव, काय देव, कोण आई, बाबा, आजी, आजोबा...तो कोणालाच नाही ओळखंत.
त्‍याला माहितीये फक्‍तं आपलं अस्‍तित्‍वं टिकवणं. पण ते सुद्‍धा किती दुसर्‍यांवर अवलंबलेलं...
साधं मला भूक लागलीये हे सुद्‍धा सांगता येणार नाही त्‍याला. आला आपला बिनबोभाटपणे या जगात. हा काय विश्‍वास...(काय हा विश्‍वास). ज्‍या मंडळींच्‍या हातात पडणार ते बघतील काय ते... तारायचं की मारायचं.
भयानक आहे कल्‍पना सुद्‍धा. नकोच तो विचार, विचारांतसुद्‍धा.

अगम्‍य आहे सगळं. देव देव तो हाच बहुतेक. निसर्गाचा खेळ झालं.....

-सोनल मोडक

Tuesday, November 06, 2007

Sunday, May 06, 2007

COLOURS...MOODS...DATS ME GUYS !!!






back with a bang....MISSION ACCOMPLISHED :)

PROUD PARENT - DADDY


PROUD PARENT - MOMMY

BABY'S DAY OUT...


MOMMY SAYS I'M A GOOD BOY

AM I REALLY....?

Thursday, August 17, 2006

my enounter with GOD...










all photos by : sonal and minal modak

Wednesday, August 16, 2006

kabhi alvida na kehna...

We all have gathered on the occasion of 15th august, all of us having a holiday. (leave aside the ideological patriotism n ur duties towards nation !!! we r getting a day off n we, ‘the’ family want to enjoy our day together.)
A plan comes up, lets have good food n catch up with some nice movie…ANTHONY KAUN HAI would be a good choice to enjoy the laughter together!!!

God!!! it’s a holiday n our navi mumbai has the one n only multiplex dat normally gets flooded as if there is nothing better to do on holidays !!!…so there we were...watching KANK…!!!

We were hoping for few good looking faces wearing nice clothes. Beautiful locations, some, not so bad music n that’s how the movie would end. As simple as that !!! but who knew what we had in store for us…yes there were good faces of RANI and PRIETY (most of the time crying or confused), let me not comment on the locations which were overpowered by ‘the’ SHAHRUKH !!! his sick attitude towards life n people who loved him was …PATHETIC!!!
AMITABH, ABHISHEK, KIRON KHER did little good to the film by entertaining us…but that’s to their own credit…director was nowhere to stand by.
We all managed to survive the movie n get out with a headache…

….
…….
NOOO…I’ve still to derive the morale of the story…!!!