













एकलेपणा आणि नैराश्य यातून बाहेर पडून त्याला आनंदाचे क्षण वेचायचे आहेत. त्यासाठी अनिश्चिततेच्या या चक्रव्यूहातून त्याची त्यालाच सुतका करुन घ्यायची आहे. त्याच्याकडे ह्याशिवाय दुसरा पर्याय नाहीय. परस्पर विरोधी गोष्टींनी भरलेल्या स्वत:च्या व्यक्तीमत्वाची त्याला जाणीव होणं आवश्यक आहे. सगळीकडे गोंगाट, गजबजाट आहे आणि त्यातूनच त्याला सगळ्यांशी संवाद साधायचा आहे. तमाम भौतिक गरजा पुरवणारं भोवतालचं जग, जे आत्मशक्तीचा, आत्मोन्नतीचा मार्ग दाखवू शकत नाही, अशा आजच्या जगाचाच तो एक भाग आहे. अशा ह्या गोंधळलेल्या अवस्थेत तो कधी निकरावर येत तर कधी स्वत:ला भिरकावून दिल्यासारखा जगत राहतोय। समाजाची आजची अवस्था अशीच झाली आहे। आणि अशा वेळी अभिमन्यू काय किंवा एकूणच समाज काय, नेमकं कुठल्या प्रकारचं भविष्य अपेक्षितो आहे, याचा शोध घेण्याची वेळ आता आली आहे. मला इथे एक गझल आठवते,
अपनी मर्जीसे कहां अपने सफर पर हम है,
रुख हवा का जिधरका है उधरके हम है॥
माझं हे मत वाचणार्या प्रत्येकाने यावर विचार करावा. मला असं वाटतं हे तर मी स्वत: जगत आलेय आजपर्यंतं. दरवेळी स्वत:ला जाणता- जाणता तपासून पाहत किंवा आसपासच्या वातावरणाशी जमवून घेत, स्वत:च्या मनाला न पटणार्या गोष्टी करतांना मी मझी स्वत:ची ओळखंच विसरुन बसते. पण ही गोष्टं तितकीच खरी की प्रत्येकालाच यात एखादातरी आशेचा किरण, एक दिशा मिळतेच. तो किरण मला मिळाला आहे...
नकारात्मक दृष्टीकोण पूर्णपणे बदलायचा प्रयत्नं करणार आहे. पण नव्याच्या शोधात जुने गमवायचा मूर्खपणा मी करणार नाहिये. तुम्हीसुद्धा लवकरच यावर विचार करा आणि वेळ हातातून जाउ देऊ नका। -
सोनल मोडक
- सोनल मोडक
- सोनल मोडक
-सोनल मोडक