Wednesday, June 25, 2008

हरेकृष्‍णजी,

आम्‍ही स्‍वत:च्‍याच व्‍यापात असे गुरफटून गेलोय अहो, की समाजाबद्‍दल विचार करायला वेळच नाही जणू...
विचार येतात, डोकं उत्तर शोधायचा छोटासा प्रयत्‍नं करतो, तेवढ्‍यात गँसवर ठेवलेलं दूध ऊतू जातं...
मग मला सांगा, समाजाचे प्रश्‍नं मोठे की शेगडी साफ करायची आवश्‍यता?
पेन घ्‍यावं काही लिहायला आणि तेव्‍हड्‍यात बाळाने शू-शू करावी...मग आली ना धावपळ !!

कळतंय हो सगळं...वळत नाहीय.
स्‍वत:च्‍याच पाशातून बाहेर डोकावून पाहील्‍याशिवाय गोष्‍टी दिसणारच नाहीयेत. पंचवार्षिक योजनेत आहे हा इश्‍यू आहे पाहिल्‍या नंबरवर...पण योजना पाचंच वर्षात संपते की नाही ते पहायचं.
गवर्नमेंटचा प्रोजेक्‍ट नाही हा, त्‍यामुळे वेळेत गोष्‍टी होण्‍याची शक्‍यताच जास्‍त, so... :) बघू !!

2 comments:

A woman from India said...

सोनल,
थोडं स्पष्टं लिहीते आहे. कृपया राग मानू नये.
मी आणि माझे सोडून दुसर्‍या गोष्टींचा फारसा विचार नं करणे ही वृत्ती फार जास्त दिसून येते. या पोस्टमधे दिलेली कारणे ही फक्त त्या वृत्तीचे समर्थन करण्यासाठी दिली आहेत असे वाटते.
ब्लॉग लिहायला वेळ मिळतो नं? मग उचला की लेखणी दुसर्‍यांसाठी. नाही प्रत्यक्ष काही करता आलं तरी एव्हढं तर करता येईल?
उतू जाणारे दूध, बाळाची शू-शू वगैरे कारणे पुढे करण्याआधी साधना ताई, मंदा ताई आमटे यांची चरित्रे वाचा. त्यांनी कसे सांभाळले आपापले संसार आणि दुसर्‍यांचेही? त्यांनी ही कारणे दिली असती तर?
कथा,कविता,स्वानुभव यातून मराठी ब्लॉगकारांनी बाहेर पडावे असे हरेकृष्णाजींचे म्हणणे आहे ते अगदी योग्य आहे.

sonal m m said...

have u read the earlier post?
how would u interprete it?