पावसाची सर
अंतरी काहूर
प्रीतीचा पाझर
दगडाला
वठलेला वृक्ष
जणू काळपुरुष
आशेचा धुमारा
त्यालाही फुटे
काडी काडी जोडून
चिमणीचे घर
पावसात बिचारे
गेले वाहून
इवलासा जीव
कसा कळवळे
तान्ह्या पिलासाठी
घर पुन्हा नवे
निसर्गाचा बघा
भला हा नियम
प्रलयातूनही
नवे जग साकारे..
- सोनल मोडक
Friday, June 27, 2008
मला मिळालेली एक प्रतिक्रिया,
सोनल,
थोडं स्पष्टं लिहीते आहे. कृपया राग मानू नये.
मी आणि माझे सोडून दुसर्या गोष्टींचा फारसा विचार नं करणे ही वृत्ती फार जास्त दिसून येते. या पोस्टमधे दिलेली कारणे ही फक्त त्या वृत्तीचे समर्थन करण्यासाठी दिली आहेत असे वाटते.
ब्लॉग लिहायला वेळ मिळतो नं? मग उचला की लेखणी दुसर्यांसाठी. नाही प्रत्यक्ष काही करता आलं तरी एव्हढं तर करता येईल?
उतू जाणारे दूध, बाळाची शू-शू वगैरे कारणे पुढे करण्याआधी साधना ताई, मंदा ताई आमटे यांची चरित्रे वाचा. त्यांनी कसे सांभाळले आपापले संसार आणि दुसर्यांचेही? त्यांनी ही कारणे दिली असती तर?
कथा,कविता,स्वानुभव यातून मराठी ब्लॉगकारांनी बाहेर पडावे असे हरेकृष्णाजींचे म्हणणे आहे ते अगदी योग्य आहे.
माझं मत...
कसंकाय,
पोस्ट लिहीली ती इतरांची मतं जाणून घेता यावीत म्हणूनच. त्यामुळे तुमचं मत वाचून राग यायचा प्रश्नंच नाही. तुम्ही म्हणता ते अगदी खरे आहे. आजच्या घडीला माणूस मतलबी बनत चालला आहे, आणि मीही त्याला अपवाद नाही. कारण मीही त्याच समाजाचा एक घटक आहे. साधना ताई, मंदा ताई आमटे यांची चरित्रे नाही वाचली मी अजून. पण त्यांच्या कामाबद्दल मला नक्कीच माहीती आहे आणि मी त्याबद्दल त्यांचा आदरही करते. पण म्हणूनच सगळ्यांनाच त्यांच्यासारखं बनता येईल किंवा सगळ्यांनीच त्यांनी जे आणि जसं केलं तेच आणि तसं करावं याला माझा विरोध आहे. प्रत्येक जागृक नागरिक आजच्या घडीला जितकं आणि जसं, जमेल तसं सामाजिक बंधन पार पाडतोच आहे हा माझा अनुभव आहे.
आणि मीही त्याला अपवाद नाही. किती मोठी पेक्षा किती मनापासून आणि कुठे मदत करतो ते जास्तं महत्वाचं.
सो, माझी एकच विनंती की चार ओळी वाचून माणसाबद्दल मतं बनवू नका. कारण लिखाण हे प्रत्येकाच्या मानसिकतेचं प्रतिबिंब असतं असं माझं मत आहे. त्यामुळे उद्याचं लिखाण आजच्या मतांपेक्षा वेगळंही असू शकतं. म्हणजेच कथा,कविता,स्वानुभव ह्याच्या पलिकडलंही !!!
- सोनल मोडक
थोडं स्पष्टं लिहीते आहे. कृपया राग मानू नये.
मी आणि माझे सोडून दुसर्या गोष्टींचा फारसा विचार नं करणे ही वृत्ती फार जास्त दिसून येते. या पोस्टमधे दिलेली कारणे ही फक्त त्या वृत्तीचे समर्थन करण्यासाठी दिली आहेत असे वाटते.
ब्लॉग लिहायला वेळ मिळतो नं? मग उचला की लेखणी दुसर्यांसाठी. नाही प्रत्यक्ष काही करता आलं तरी एव्हढं तर करता येईल?
उतू जाणारे दूध, बाळाची शू-शू वगैरे कारणे पुढे करण्याआधी साधना ताई, मंदा ताई आमटे यांची चरित्रे वाचा. त्यांनी कसे सांभाळले आपापले संसार आणि दुसर्यांचेही? त्यांनी ही कारणे दिली असती तर?
कथा,कविता,स्वानुभव यातून मराठी ब्लॉगकारांनी बाहेर पडावे असे हरेकृष्णाजींचे म्हणणे आहे ते अगदी योग्य आहे.
माझं मत...
कसंकाय,
पोस्ट लिहीली ती इतरांची मतं जाणून घेता यावीत म्हणूनच. त्यामुळे तुमचं मत वाचून राग यायचा प्रश्नंच नाही. तुम्ही म्हणता ते अगदी खरे आहे. आजच्या घडीला माणूस मतलबी बनत चालला आहे, आणि मीही त्याला अपवाद नाही. कारण मीही त्याच समाजाचा एक घटक आहे. साधना ताई, मंदा ताई आमटे यांची चरित्रे नाही वाचली मी अजून. पण त्यांच्या कामाबद्दल मला नक्कीच माहीती आहे आणि मी त्याबद्दल त्यांचा आदरही करते. पण म्हणूनच सगळ्यांनाच त्यांच्यासारखं बनता येईल किंवा सगळ्यांनीच त्यांनी जे आणि जसं केलं तेच आणि तसं करावं याला माझा विरोध आहे. प्रत्येक जागृक नागरिक आजच्या घडीला जितकं आणि जसं, जमेल तसं सामाजिक बंधन पार पाडतोच आहे हा माझा अनुभव आहे.
आणि मीही त्याला अपवाद नाही. किती मोठी पेक्षा किती मनापासून आणि कुठे मदत करतो ते जास्तं महत्वाचं.
सो, माझी एकच विनंती की चार ओळी वाचून माणसाबद्दल मतं बनवू नका. कारण लिखाण हे प्रत्येकाच्या मानसिकतेचं प्रतिबिंब असतं असं माझं मत आहे. त्यामुळे उद्याचं लिखाण आजच्या मतांपेक्षा वेगळंही असू शकतं. म्हणजेच कथा,कविता,स्वानुभव ह्याच्या पलिकडलंही !!!
- सोनल मोडक
Wednesday, June 25, 2008
कविता
तिची मी नेहमीच वाट पाहते
कधीतरी अवचित ती येते
अकल्पितातून अवचितपणे
अलवार, अलगद आठवणींच्या रुपाने...कविता उलगडते
-सोनल मोडक
कधीतरी अवचित ती येते
अकल्पितातून अवचितपणे
अलवार, अलगद आठवणींच्या रुपाने...कविता उलगडते
-सोनल मोडक
हरेकृष्णजी,
आम्ही स्वत:च्याच व्यापात असे गुरफटून गेलोय अहो, की समाजाबद्दल विचार करायला वेळच नाही जणू...
विचार येतात, डोकं उत्तर शोधायचा छोटासा प्रयत्नं करतो, तेवढ्यात गँसवर ठेवलेलं दूध ऊतू जातं...
मग मला सांगा, समाजाचे प्रश्नं मोठे की शेगडी साफ करायची आवश्यता?
पेन घ्यावं काही लिहायला आणि तेव्हड्यात बाळाने शू-शू करावी...मग आली ना धावपळ !!
कळतंय हो सगळं...वळत नाहीय.
स्वत:च्याच पाशातून बाहेर डोकावून पाहील्याशिवाय गोष्टी दिसणारच नाहीयेत. पंचवार्षिक योजनेत आहे हा इश्यू आहे पाहिल्या नंबरवर...पण योजना पाचंच वर्षात संपते की नाही ते पहायचं.
गवर्नमेंटचा प्रोजेक्ट नाही हा, त्यामुळे वेळेत गोष्टी होण्याची शक्यताच जास्त, so... :) बघू !!
विचार येतात, डोकं उत्तर शोधायचा छोटासा प्रयत्नं करतो, तेवढ्यात गँसवर ठेवलेलं दूध ऊतू जातं...
मग मला सांगा, समाजाचे प्रश्नं मोठे की शेगडी साफ करायची आवश्यता?
पेन घ्यावं काही लिहायला आणि तेव्हड्यात बाळाने शू-शू करावी...मग आली ना धावपळ !!
कळतंय हो सगळं...वळत नाहीय.
स्वत:च्याच पाशातून बाहेर डोकावून पाहील्याशिवाय गोष्टी दिसणारच नाहीयेत. पंचवार्षिक योजनेत आहे हा इश्यू आहे पाहिल्या नंबरवर...पण योजना पाचंच वर्षात संपते की नाही ते पहायचं.
गवर्नमेंटचा प्रोजेक्ट नाही हा, त्यामुळे वेळेत गोष्टी होण्याची शक्यताच जास्त, so... :) बघू !!
बुडबुडे
हवेत तरंग, पाण्यावर बुडबुडे उठतंच राहतात. छोटे छोटे बुडबुडे पाहायला मजा वाटते. हजारो बुडबुड्यांमधून मोजकेच मोठे होतात, बाकी बिचारे कधी येतात आणि कधी जातात काही हिशोब राहत नाही...चकचकीत पृष्ठभागावर सप्तरंग चमकतात. पाहणारा प्रत्येक जण मोहून जातो त्यांना बघून. जिवाच्या आकांताने पाठपुरावाही करतो त्यांचा..अंतापर्यंत...स्वत:च्या ! पण त्यानी मोठं होणं त्याच्या नशिबात नसतं लिहिलेलं..तो तसाच छोटा बुडबुडा म्हणूनच फुटुन जातो.
ठरवतं तरी कोण की कोणी मोठं व्हायचंय आणि कोणी छोटंच राहायचंय?
तुम्ही भलेही माराल हो हातपाय मोठं होण्यासाठी...पण सागळ्यांनाच यश मिळतं? कोण ठरवतं मग, की ह्याच्या प्रयत्नांना यश द्यायचं आणि ह्याला तसंच हातपाय मारत सोडून द्यायचं?
इथे "देव" हे उत्तर मला नक्कीच अपेक्षित नाही !!
पण खरं उत्तर तर मलाही माहित नाही अजून.
तुम्हाला माहीत असेल तर मला नक्की सांगा...
-सोनल मोडक
ठरवतं तरी कोण की कोणी मोठं व्हायचंय आणि कोणी छोटंच राहायचंय?
तुम्ही भलेही माराल हो हातपाय मोठं होण्यासाठी...पण सागळ्यांनाच यश मिळतं? कोण ठरवतं मग, की ह्याच्या प्रयत्नांना यश द्यायचं आणि ह्याला तसंच हातपाय मारत सोडून द्यायचं?
इथे "देव" हे उत्तर मला नक्कीच अपेक्षित नाही !!
पण खरं उत्तर तर मलाही माहित नाही अजून.
तुम्हाला माहीत असेल तर मला नक्की सांगा...
-सोनल मोडक
Monday, June 09, 2008
मला काय हवंय?
पैसा : हो! निश्चितच त्याशिवाय मन:शांती मिळणं कठीण. मला कोणी टाटा-बिर्ला नाही व्हायचंय.
पण कधीही मनात आलं (माझ्या किंवा माझ्या जवळच्यांच्या) की काहीही घेता यावं.
कोणी कधी मदत मागायला आल्यावर पैसे नाहीत ह्या कारणाने नाही म्हणायला लागू नये. एव्हडा पैसा तरी हवा.
नक्कीच मेहनतीने कमावलेला, जेणेकरुन रात्रीची स्वस्थ झोपही मिळावी.
शिस्त : त्याशिवाय माणसाची ultimate वाट लागू शकते. मी अनुभवते आहे ती स्थिती सध्या ! moody असणं ठीक आहे. त्यात काही वाईट आहे असं मला तरी नाही वाटत. पण आयुष्यात शिस्तं असणं फार आवश्यक.
ज्यामुळे day-to-day duties करता करताच फे-फे नाही होणार. energy loss नको त्या गोष्टीत आणि त्याच त्याच गोष्टींत नाही होणार. नवनवीन गोष्टी करायचा उत्साह शाबूत राहील. जिवंतपणा टिकून राहण्यासाठी नाविन्य अत्यावश्यक.
शिस्तीबरोबर स्वस्थ आणि निरोगी मन आणि शरीर आपसूकच येणार.
मन:स्वास्थ्य / समाधान / peace of mind : overall 100 पैकी जास्तीत जास्त कामं यशस्वी व्हायला लागली की छोटी छोटी अपयशं ( failures) मनावर तितकासा नकारात्मक परिणाम नाही करणार. त्यांना शांतपणे तोंड द्यायची शक्ती पण सहज मिळेल. भिजत घोंगडी न राहता यशस्वीपणे संकटातून बाहेर पडायचे मार्ग सूचत राहतील.
संकटं किंवा दु:ख नकोत असं मी कधीच नाही म्हणणार. पण त्यांना तोंड द्यायला, त्यातून बाहेर पडण्यासाठी विचार करायला शांतचित्त फार आवश्यक. मनासारखी माणसं भोवती असणं किंवा भोवती असलेल्या माणसांना आहेत तसं स्वीकारणं ह्यातूनच सर्व सोपं होणार. मात्र टाळी वाजणयासाठी दोन हात हवेत. नाहीतर दुसर्याला जोरदार फटकाच बसायचा.
चारचाकी वाहनाचं wheel balancing काही उगीचंच नाही करत. तोच नियम माणसालाही लागू पडतो.
कुठचंही नातं, अगदी कुठचंही नातं (आई-मुल, नवरा-बायको, भावंडं अगदी नोकर-मालक सुद्धा) नातं यशस्वी होण्यात दोन्ही बाजूंकडून एकसारखे प्रयत्नं होणं आवश्यक. नाहीतर त्यातल्यात्यात weak बाजूची फरपट आणि strong बाजूची गळचेपी होणं अनिवार्य. friction मधून झीज होते. नात्यातला ओलावाही नाहीसा होवू शकतो. एकदा त्या stage ला पोहोचल्यावर पुन्हा ओलावा निर्माण करण्याचे प्रयत्न माणसाचा कस खाऊन जातात. त्यासाठी वेळच्यावेळी मतं clear करणं आवश्यक.
एक बेसिक गरज : संवाद तेव्हाच होवू शकतो जेव्हा दोन व्यक्ती सम पातळीवर येतात आणि तेव्हाच त्या जे बोलतात ते एकमेकांपर्यंत पोचतं. मधल्यामधे हवेत विरलेल्या भवना आणि शब्द गैरसमजच वाढवतात. त्यामुळे स्पष्टं आणि स्वच्छं विचार आणि बरोबर शब्दांचा वापर फार आवश्यक. माणसाचे विचार दुसर्यापर्यंत पोहोचवण्यासाठी अजून तरी शब्द-संवाद हा एकच मार्ग वापरला जातो.
(telepathy वगैरे दूरच्या गोष्टी. मनच जिथे थार्यावर नसेल, तिथे स्वत:लाच स्वत:चे विचार ऐकू येणं मुश्कील
तर दुसर्यापर्यंत तुम्ही ते मन-to-मन काय पोहोचवणार.) असो !
त्यामुळे आपल्याला काय वाटते ते समोरच्याला माहित होणं अगदीच आवश्यक. जेव्हा माणसा-माणसांत भिंती उभ्या राहतात, भावनाच काय शब्दही दुसरीकडे पोहोचू शकत नाहीत मग !
बस्स ! फार काही नाही, इतकंच. ह्या सगळ्या कमवायच्याच गोष्टी आहेत म्हणा...free में कुछ भी नही मिलता.
माझ्या ह्या काही ईच्छा, फार मोठ्या नाहीत. पण त्यात involved sub-sections लिहायला घेतले तर मात्र फार मोठी गोची होईल सो लिखाण इथेच थांबवून विचारांना थोडी गति देते..काय !!
पण कधीही मनात आलं (माझ्या किंवा माझ्या जवळच्यांच्या) की काहीही घेता यावं.
कोणी कधी मदत मागायला आल्यावर पैसे नाहीत ह्या कारणाने नाही म्हणायला लागू नये. एव्हडा पैसा तरी हवा.
नक्कीच मेहनतीने कमावलेला, जेणेकरुन रात्रीची स्वस्थ झोपही मिळावी.
शिस्त : त्याशिवाय माणसाची ultimate वाट लागू शकते. मी अनुभवते आहे ती स्थिती सध्या ! moody असणं ठीक आहे. त्यात काही वाईट आहे असं मला तरी नाही वाटत. पण आयुष्यात शिस्तं असणं फार आवश्यक.
ज्यामुळे day-to-day duties करता करताच फे-फे नाही होणार. energy loss नको त्या गोष्टीत आणि त्याच त्याच गोष्टींत नाही होणार. नवनवीन गोष्टी करायचा उत्साह शाबूत राहील. जिवंतपणा टिकून राहण्यासाठी नाविन्य अत्यावश्यक.
शिस्तीबरोबर स्वस्थ आणि निरोगी मन आणि शरीर आपसूकच येणार.
मन:स्वास्थ्य / समाधान / peace of mind : overall 100 पैकी जास्तीत जास्त कामं यशस्वी व्हायला लागली की छोटी छोटी अपयशं ( failures) मनावर तितकासा नकारात्मक परिणाम नाही करणार. त्यांना शांतपणे तोंड द्यायची शक्ती पण सहज मिळेल. भिजत घोंगडी न राहता यशस्वीपणे संकटातून बाहेर पडायचे मार्ग सूचत राहतील.
संकटं किंवा दु:ख नकोत असं मी कधीच नाही म्हणणार. पण त्यांना तोंड द्यायला, त्यातून बाहेर पडण्यासाठी विचार करायला शांतचित्त फार आवश्यक. मनासारखी माणसं भोवती असणं किंवा भोवती असलेल्या माणसांना आहेत तसं स्वीकारणं ह्यातूनच सर्व सोपं होणार. मात्र टाळी वाजणयासाठी दोन हात हवेत. नाहीतर दुसर्याला जोरदार फटकाच बसायचा.
चारचाकी वाहनाचं wheel balancing काही उगीचंच नाही करत. तोच नियम माणसालाही लागू पडतो.
कुठचंही नातं, अगदी कुठचंही नातं (आई-मुल, नवरा-बायको, भावंडं अगदी नोकर-मालक सुद्धा) नातं यशस्वी होण्यात दोन्ही बाजूंकडून एकसारखे प्रयत्नं होणं आवश्यक. नाहीतर त्यातल्यात्यात weak बाजूची फरपट आणि strong बाजूची गळचेपी होणं अनिवार्य. friction मधून झीज होते. नात्यातला ओलावाही नाहीसा होवू शकतो. एकदा त्या stage ला पोहोचल्यावर पुन्हा ओलावा निर्माण करण्याचे प्रयत्न माणसाचा कस खाऊन जातात. त्यासाठी वेळच्यावेळी मतं clear करणं आवश्यक.
एक बेसिक गरज : संवाद तेव्हाच होवू शकतो जेव्हा दोन व्यक्ती सम पातळीवर येतात आणि तेव्हाच त्या जे बोलतात ते एकमेकांपर्यंत पोचतं. मधल्यामधे हवेत विरलेल्या भवना आणि शब्द गैरसमजच वाढवतात. त्यामुळे स्पष्टं आणि स्वच्छं विचार आणि बरोबर शब्दांचा वापर फार आवश्यक. माणसाचे विचार दुसर्यापर्यंत पोहोचवण्यासाठी अजून तरी शब्द-संवाद हा एकच मार्ग वापरला जातो.
(telepathy वगैरे दूरच्या गोष्टी. मनच जिथे थार्यावर नसेल, तिथे स्वत:लाच स्वत:चे विचार ऐकू येणं मुश्कील
तर दुसर्यापर्यंत तुम्ही ते मन-to-मन काय पोहोचवणार.) असो !
त्यामुळे आपल्याला काय वाटते ते समोरच्याला माहित होणं अगदीच आवश्यक. जेव्हा माणसा-माणसांत भिंती उभ्या राहतात, भावनाच काय शब्दही दुसरीकडे पोहोचू शकत नाहीत मग !
बस्स ! फार काही नाही, इतकंच. ह्या सगळ्या कमवायच्याच गोष्टी आहेत म्हणा...free में कुछ भी नही मिलता.
माझ्या ह्या काही ईच्छा, फार मोठ्या नाहीत. पण त्यात involved sub-sections लिहायला घेतले तर मात्र फार मोठी गोची होईल सो लिखाण इथेच थांबवून विचारांना थोडी गति देते..काय !!
Wednesday, May 28, 2008
लिखाणाकडे तशी मी नकळत वळले. लहानपणापासून डायरी लिहायचे मी, नाही म्हणायला. पण त्यातले विचार अतिशय अंदाधुंद, विस्कळीत असायचे. मला नक्की काय म्हणायचंय ते मी चपखल अशा शब्दात कधीच मांडू शकले नाही. सुरु एकीकडून केले तर शेवट दुसरीकडेच कुठेतरी व्हायचा. मूळ मुद्दा हरवूनच जायचा. आणि नंतर वाचायला घेतले की मीच हरवून जायचे त्यात.
मनातली घुसमट बाहेर काढणं हा मुळ हेतु असायचा. कारण मी होते घुमी. कधी काही धडपणे न बोलणारी. लाजत, संकोचत, अडखळत काहीतरी बोलणारी. हजारो गंड मनात बाळगून, स्वत:ला जगापासुन लपवत जगणरी. बरं तसं असलंतरी मनात विचार तर चालूच. कोणाचं काही पटणार नाही, कोणाचं वागणंच खुपत राहणार. पण मोकळेपणाने बोलणं नाही कधी.
माझे विचार मी अजुनही स्पष्टपणे आणि नेमकेपणाने मांडू शकत नाही. माझी ही कायमचीच खंत राहील. इतरांचं स्वच्छ, परखड, to the point लिखाण वाचलं की मी अजुन किती पाण्यात आहे ह्याची सतत जाणीव होत राहते. तर असा माझा प्रवास. अखंड, निरंतन चालू रहावा हीच ईच्छा.
- सोनल मोडक
मनातली घुसमट बाहेर काढणं हा मुळ हेतु असायचा. कारण मी होते घुमी. कधी काही धडपणे न बोलणारी. लाजत, संकोचत, अडखळत काहीतरी बोलणारी. हजारो गंड मनात बाळगून, स्वत:ला जगापासुन लपवत जगणरी. बरं तसं असलंतरी मनात विचार तर चालूच. कोणाचं काही पटणार नाही, कोणाचं वागणंच खुपत राहणार. पण मोकळेपणाने बोलणं नाही कधी.
माझे विचार मी अजुनही स्पष्टपणे आणि नेमकेपणाने मांडू शकत नाही. माझी ही कायमचीच खंत राहील. इतरांचं स्वच्छ, परखड, to the point लिखाण वाचलं की मी अजुन किती पाण्यात आहे ह्याची सतत जाणीव होत राहते. तर असा माझा प्रवास. अखंड, निरंतन चालू रहावा हीच ईच्छा.
- सोनल मोडक
नाती
मनुष्य प्राणी ही समुहात वावारणारी जमात !! रक्ताची नाती निसर्ग न विचारता बहाल करतो.. आपण जसे मोठे होत जातो (वयानी बरं का) आपण आपली नवी नाती जोडत जातो. तसं पाहिलं तर जन्मभर पुरणारं कोणतंच नातं नाही... जितकी नवी नाती बनत जातात, तशीच जुनी तुटंत राहतात.. काही प्रत्यक्ष अंतरामुळे तर काही मनात पडत जाणर्या खोल खोल दरीमुळे. तरी आपल्याला माणसं जोडावीशी वाटतंच राहतात...निसर्गाचा नियमच आहे बहुतेक तो.
हर गली हर सडक बेशुमार आदमी
फिर भी तनहाईयोंका शिकार आदमी...
नाही का.. हा तर आपणा सगळ्यांचाच अनुभव.. अशा वेळेस आपली आपल्यालाच साथ उरते..
खटाळभर मित्र, मात्र आपल्या दु:खात आपणच आपले.. स्वत:च पडायचं, स्वत:च उठायचं आणि पुन्हा काहीच झालं नाही अशा आविर्भावात नव्याने चालायला लागायचं.
पुन्हा नवी दिशा, नवी आशा आणि नव्या ठेचा..
हां मात्र चेहर्यावर हासु कायम पाहिजे बरं !
का तर म्हणे आयुष्याचं ultimate ध्येय आनंदी असणं आहे.
कोणी ठरवलं हे?
असं नाही विचारायचं आपण.. आपण फक्तं आनंदाच्या दिशेने चालत रहायचं.
म्हणजे नक्की काय करायचं GOD only knows !
- सोनल मोडक
हर गली हर सडक बेशुमार आदमी
फिर भी तनहाईयोंका शिकार आदमी...
नाही का.. हा तर आपणा सगळ्यांचाच अनुभव.. अशा वेळेस आपली आपल्यालाच साथ उरते..
खटाळभर मित्र, मात्र आपल्या दु:खात आपणच आपले.. स्वत:च पडायचं, स्वत:च उठायचं आणि पुन्हा काहीच झालं नाही अशा आविर्भावात नव्याने चालायला लागायचं.
पुन्हा नवी दिशा, नवी आशा आणि नव्या ठेचा..
हां मात्र चेहर्यावर हासु कायम पाहिजे बरं !
का तर म्हणे आयुष्याचं ultimate ध्येय आनंदी असणं आहे.
कोणी ठरवलं हे?
असं नाही विचारायचं आपण.. आपण फक्तं आनंदाच्या दिशेने चालत रहायचं.
म्हणजे नक्की काय करायचं GOD only knows !
- सोनल मोडक
Friday, May 23, 2008
असंच..
मनातल्या भावनांचा रंग उतरतो कागदावर
सुंदर चित्र बनत जाते
मन भरुन येतं, डोळे वाहू लागतात
आणि शब्दही झिम्मा घालू लागतात
शब्दांची लड झरू लागते
आणि मनाच्या हिरवळीवर
आठवणींचे दवबिंदू जमू लागतात...
अलवार अलगद...!!
-सोनल मोडक
सुंदर चित्र बनत जाते
मन भरुन येतं, डोळे वाहू लागतात
आणि शब्दही झिम्मा घालू लागतात
शब्दांची लड झरू लागते
आणि मनाच्या हिरवळीवर
आठवणींचे दवबिंदू जमू लागतात...
अलवार अलगद...!!
-सोनल मोडक
Thursday, May 22, 2008
ईच्छा
आता मी ठरवलंय
तिला बहरु द्यायचं
तिलाही हळुवार ऊमलू द्यायचं
तिच्याबरोबर आपणही फुलत जायचं
कितीदा मारलंय मी तिला आजवर
कधी कोणासाठी, तर कधी दबून
मनातल्या मनात तिचा
मी किती केलाय कोंडमारा
पण प्रत्येक वेळी तिचाच का द्यायचा बळी
दुसर्यांचा विचार करतांना स्वत:चा विचार कधी करायचा !!
म्हणून मी ठरवलंय...
तिला बहरु द्यायचं
तिलाही हळुवार ऊमलू द्यायचं
तिच्याबरोबर आपणही फुलत जायचं
कितीदा मारलंय मी तिला आजवर
कधी कोणासाठी, तर कधी दबून
मनातल्या मनात तिचा
मी किती केलाय कोंडमारा
पण प्रत्येक वेळी तिचाच का द्यायचा बळी
दुसर्यांचा विचार करतांना स्वत:चा विचार कधी करायचा !!
म्हणून मी ठरवलंय...
मी अगदी शांत राहीन !
सहन होतंय तोपर्यंत
मी अगदी शांत राहीन
मनात खोलवर रुतलेलं दु:ख
आत आत दाबत राहीन..
आज ना उद्या होईल ठीक सारं
असा खोटा दिलासा मनाला देत राहीन
तेच तर करत आले आहे आजपर्यंत
रोजच स्वत:ला सांभाळत राहीन..
पण कुठेतरी खरंच थांबेल ना हे सारं?
किती दिवस..?
सहन होतंय तोपर्यंतच ना..
हरकत नाही, मी अगदी शांत राहीन !
मी अगदी शांत राहीन
मनात खोलवर रुतलेलं दु:ख
आत आत दाबत राहीन..
आज ना उद्या होईल ठीक सारं
असा खोटा दिलासा मनाला देत राहीन
तेच तर करत आले आहे आजपर्यंत
रोजच स्वत:ला सांभाळत राहीन..
पण कुठेतरी खरंच थांबेल ना हे सारं?
किती दिवस..?
सहन होतंय तोपर्यंतच ना..
हरकत नाही, मी अगदी शांत राहीन !
come september...
Green day-wake me up when september ends...
Summer has come and passed
The innocent can never last
wake me up when september ends
like my fathers come to pass
seven years has gone so fast
wake me up when september ends
here comes the rain again
falling from the stars
drenched in my pain again
becoming who we are
as my memory rests
but never forgets what I lost
wake me up when september ends
summer has come and passed
the innocent can never last
wake me up when september ends
ring out the bells again
like we did when spring began
wake me up when september ends...
Summer has come and passed
The innocent can never last
wake me up when september ends
like my fathers come to pass
seven years has gone so fast
wake me up when september ends
here comes the rain again
falling from the stars
drenched in my pain again
becoming who we are
as my memory rests
but never forgets what I lost
wake me up when september ends
summer has come and passed
the innocent can never last
wake me up when september ends
ring out the bells again
like we did when spring began
wake me up when september ends...
one more chance tonight !
well I didn't mean for this to go as far as it did..
and I didn't mean to get so close and share what we did..
and I didn't mean to fall in love, but I did..
and you didn't mean to love me back, but I know you did..
.....but what I wouldn't give to have one more chance tonight, one more chance tonight !
and I didn't mean to get so close and share what we did..
and I didn't mean to fall in love, but I did..
and you didn't mean to love me back, but I know you did..
.....but what I wouldn't give to have one more chance tonight, one more chance tonight !
Tuesday, May 13, 2008
बलात्कार ही काय फक्तं शारीर क्रिया आहे? मला नाही वाटत तसं. जेव्हा एखाद्या मनाचा तोल ढळतो,
तेव्हा तिथेच पहिला बलात्कार झालेला असतो. मग घटते ती फक्तं क्रिया ! त्याची तर गणतीच नको. तुम्ही प्रामाणिक, सज्जन आहात म्हणजे नेमकं काय? जर तुमच्या मनात स्त्रिला पाहिल्यावर फक्तं वासनाच येते,
तर तुम्ही तसं काही प्रत्यक्ष केलं नाही म्हणून फक्तं प्रामाणिक ठरता का? मनात जर ती घटना घडून गेलेली असेल
तर तुमचा सभ्यपणा, प्रामाणिकपणा तो काय!देवानं एकट्या मनुष्यप्राण्याला मेंदू नावाचा एक अतिप्रगत असा अवयव बहाल केलाय. बाकी मन वगैरे
सगळं त्यानंतर आलेलं, त्याच मेंदूतून निर्माण झालेली एक संज्ञा...दाखवू शकता मला तुम्ही मन वेगळं काढून?
पण माणसाची आख्खी ओळख त्या मनावर बेतलेली असते. मग सगळे मनाचे खेळ म्हणायचे का!
आणि हो तर त्या मनाची शुचिता आहे कुठे हल्ली? मनावर तर ताबा राहिलाच नाहिये माणसाचा.
त्याला काय उपाय मग? प्रत्यक्ष कृती न करणारे भ्रष्टं आत्मे तर खुपच आहेत अवती भवती...त्यांचं काय करावं मग!
-सोनल मोडक
तेव्हा तिथेच पहिला बलात्कार झालेला असतो. मग घटते ती फक्तं क्रिया ! त्याची तर गणतीच नको. तुम्ही प्रामाणिक, सज्जन आहात म्हणजे नेमकं काय? जर तुमच्या मनात स्त्रिला पाहिल्यावर फक्तं वासनाच येते,
तर तुम्ही तसं काही प्रत्यक्ष केलं नाही म्हणून फक्तं प्रामाणिक ठरता का? मनात जर ती घटना घडून गेलेली असेल
तर तुमचा सभ्यपणा, प्रामाणिकपणा तो काय!देवानं एकट्या मनुष्यप्राण्याला मेंदू नावाचा एक अतिप्रगत असा अवयव बहाल केलाय. बाकी मन वगैरे
सगळं त्यानंतर आलेलं, त्याच मेंदूतून निर्माण झालेली एक संज्ञा...दाखवू शकता मला तुम्ही मन वेगळं काढून?
पण माणसाची आख्खी ओळख त्या मनावर बेतलेली असते. मग सगळे मनाचे खेळ म्हणायचे का!
आणि हो तर त्या मनाची शुचिता आहे कुठे हल्ली? मनावर तर ताबा राहिलाच नाहिये माणसाचा.
त्याला काय उपाय मग? प्रत्यक्ष कृती न करणारे भ्रष्टं आत्मे तर खुपच आहेत अवती भवती...त्यांचं काय करावं मग!
-सोनल मोडक
ती,
त्याच्यात आपलं सर्व अस्तित्वं हरवून बसलेली..
ऊन्हाळ्यात कोणासाठी तरी पूर्ण आटून जाणारी..
आपल्या देहातले दगड धोंडे माणसाच्या घरासाठी देउन टाकणारी..
दोन्ही तट सुपीक करत दुथडी भरुन वाहत राहणारी..
अनिश्चित क्षय होत होत वाढत राहणारी..
नदी..जणू गरती बाई...
तो,
याचं हे असं पूर्ण ओलं असूनही कोरडं राहणं..
लाटांच्या एक एक करुन अनेक हातांनी कवेत घेणं..
हवहवसं वाटतं त्याच्या सर्वस्वी स्वाधीन होणं..
अनुभवलं असेल भलेही त्याने अशा अनेक जणींना..
तरीही तो अतृप्तं, अभोगी, अथांग...योगी !!!
- सोनल मोडक
त्याच्यात आपलं सर्व अस्तित्वं हरवून बसलेली..
ऊन्हाळ्यात कोणासाठी तरी पूर्ण आटून जाणारी..
आपल्या देहातले दगड धोंडे माणसाच्या घरासाठी देउन टाकणारी..
दोन्ही तट सुपीक करत दुथडी भरुन वाहत राहणारी..
अनिश्चित क्षय होत होत वाढत राहणारी..
नदी..जणू गरती बाई...
तो,
याचं हे असं पूर्ण ओलं असूनही कोरडं राहणं..
लाटांच्या एक एक करुन अनेक हातांनी कवेत घेणं..
हवहवसं वाटतं त्याच्या सर्वस्वी स्वाधीन होणं..
अनुभवलं असेल भलेही त्याने अशा अनेक जणींना..
तरीही तो अतृप्तं, अभोगी, अथांग...योगी !!!
- सोनल मोडक
Thursday, May 08, 2008
मातीचं ऋण
एक होता हरी. हरी कुंभार. कुंभार कसला ८- ९ वर्षाचा लहानसा मुलगाच तो.
कुंभारपण वडलांकडून वारशाने मिळालेलं, तेव्हड्यापुरतंच. बाकी मातीत खेळायला कोणाला नाही आवडणार !
तसा खेळताखेळताच तोही मातीची भांडी बनवायला शिकला आणि वडलांना कामात मदत करू लागला.
मातीत हात माखायला लागले, हळू हळू कपडेही मातीतंच रंगायला लागले. हरी कुंभार, पुरा मातीमय झाला..
भांडी बनवायला माती उपसून उपसून जमिनीत तर खड्डा बनतंच होता, पण पोटाचा खड्डा भरायला काही त्याचा उपयोग होत नव्हता. पोटाचा खड्डा वाढतंच होता.
मातीमाय त्याचं आयुष्यं असं पुरतं घेरुन बसली.
आणि एक दिवस असा आला कि तोही त्या मातीचाच झाला. पोटाचा खड्डा उरलाच नाही न् जमिनीचा खड्डा हरीने भरुन काठला...
-सोनल मोडक
कुंभारपण वडलांकडून वारशाने मिळालेलं, तेव्हड्यापुरतंच. बाकी मातीत खेळायला कोणाला नाही आवडणार !
तसा खेळताखेळताच तोही मातीची भांडी बनवायला शिकला आणि वडलांना कामात मदत करू लागला.
मातीत हात माखायला लागले, हळू हळू कपडेही मातीतंच रंगायला लागले. हरी कुंभार, पुरा मातीमय झाला..
भांडी बनवायला माती उपसून उपसून जमिनीत तर खड्डा बनतंच होता, पण पोटाचा खड्डा भरायला काही त्याचा उपयोग होत नव्हता. पोटाचा खड्डा वाढतंच होता.
मातीमाय त्याचं आयुष्यं असं पुरतं घेरुन बसली.
आणि एक दिवस असा आला कि तोही त्या मातीचाच झाला. पोटाचा खड्डा उरलाच नाही न् जमिनीचा खड्डा हरीने भरुन काठला...
-सोनल मोडक
Monday, May 05, 2008
"मला मी"
"स्वच्छ्ं मोकळा विचार" करता येणं ही दैवी शक्ती असावी बहुधा. भोवतालचं, घराघरातलं आणि मनामनातलं वास्तव स्वस्थता नाही देत. आणि अशात "स्वच्छ्ं मोकळा विचार" करता येणं ह्यासारखं सुख नाही.
अस्वस्थ मनाला शांत करण्यासाठी बाहेरून दुसरं कोणी यायची गरज नाही.
गरज आहे आपणंच आपल्याला नीट ओळखण्याची आणि त्याहुनही जास्तं, आहोत तासे स्वीकारायची.
एकटेपणावर, कुणाची तरी सोबत हा उपाय असू नाही शकत. आपली सोबत आपल्यालाच आवडायला हवी.
प्रत्येकाच्या आयुष्यात एका ठराविक वळणावर नवरा/बायको च्या रुपात एक सोबत मिळालेलीच असते.
पण माणूस म्हणून जगतांना असं काहितरी सापडायला हवं, की ज्यायोगे "मला मी" पुरेशी ठरेन.
अस्वस्थ मनाला शांत करण्यासाठी बाहेरून दुसरं कोणी यायची गरज नाही.
गरज आहे आपणंच आपल्याला नीट ओळखण्याची आणि त्याहुनही जास्तं, आहोत तासे स्वीकारायची.
एकटेपणावर, कुणाची तरी सोबत हा उपाय असू नाही शकत. आपली सोबत आपल्यालाच आवडायला हवी.
प्रत्येकाच्या आयुष्यात एका ठराविक वळणावर नवरा/बायको च्या रुपात एक सोबत मिळालेलीच असते.
पण माणूस म्हणून जगतांना असं काहितरी सापडायला हवं, की ज्यायोगे "मला मी" पुरेशी ठरेन.
Friday, May 02, 2008
पाऊस...
उन्हाळा फार वाढलाय...नद्यांबरोबर मनातले शब्दही आटून गेलेत बहुतेक...
महिना उलटला साधे दोन शब्द नाही जुळलेत अजून...अंगाची आणि मनाचीही तलखी तलखी होतेय...
पहिल्या सरीची वाट पाहातेय...तो मातीचा सुगंध मनावर नक्कीच काहीतरी जादू करेल...
धो धो पाऊस कोसळेल. मनावरची धूळ धुतली जाईल...नवे रंग, नवे आकार, झाडांना नवे धुमार...निसर्गाचा नवा हुंकार...
ये रे लवकर, अशी परीक्षा नको पाहु !!!
तो येईल...लवकर नाही, खूप वाट पहायला लावेल आधी...काय मजा मिळते त्याला कळत नाही.
येईल...धो धो बरसेल...तप्तं मनं श्रांत होतील...
आणि मग एक अशी वेळ येईल की वाटू लागेल ह्याने आता थोडं थांबावं...थोडं सबूरीनं घ्यावं...
पण तो मागे हटणार नाही...वादळ उठवेल, सगळी उलथापालथ करुन मग नामानिराळा निघून जाईल...
मग पुन्हा तोच खेळ...वाट पहायचा...!!!
-सोनल मोडक
महिना उलटला साधे दोन शब्द नाही जुळलेत अजून...अंगाची आणि मनाचीही तलखी तलखी होतेय...
पहिल्या सरीची वाट पाहातेय...तो मातीचा सुगंध मनावर नक्कीच काहीतरी जादू करेल...
धो धो पाऊस कोसळेल. मनावरची धूळ धुतली जाईल...नवे रंग, नवे आकार, झाडांना नवे धुमार...निसर्गाचा नवा हुंकार...
ये रे लवकर, अशी परीक्षा नको पाहु !!!
तो येईल...लवकर नाही, खूप वाट पहायला लावेल आधी...काय मजा मिळते त्याला कळत नाही.
येईल...धो धो बरसेल...तप्तं मनं श्रांत होतील...
आणि मग एक अशी वेळ येईल की वाटू लागेल ह्याने आता थोडं थांबावं...थोडं सबूरीनं घ्यावं...
पण तो मागे हटणार नाही...वादळ उठवेल, सगळी उलथापालथ करुन मग नामानिराळा निघून जाईल...
मग पुन्हा तोच खेळ...वाट पहायचा...!!!
-सोनल मोडक
Friday, March 28, 2008
आठवण...
तुझी आठवण,
जशी वार्याची झुळुक
तळपत्या सूर्याखाली
सुखद शीतल सावली
तुझी आठवण,
जशी वेडी श्रावणसर
पाचूंच्या हिरव्या बनात
ओलेतं ऊन उबदार
तुझी आठवण,
वाळवंटातलं मृगजळ
आभसी मायावी
पळते क्षितिजापार
तुझी आठवण,
जसा रातराणीचा सुगंध
रात्रीच्या नीरव शांततेत
बेभान, मंत्रमुग्ध
तुझी आठवण,
जसं कुपीतलं अत्तर
कसं न् केव्हा उडून जातं
पण भिनतो सुगंध नसानसात
तुझी आठवण,
दडवलेला खजिना
पडझड झाली वाड्याची
तरी जाईना आस
तुझी आठवण,
विष जहरी
आयुष्यं होतं बधीर
प्याला नको पुरे एकच घोट ...
- सोनल मोडक
जशी वार्याची झुळुक
तळपत्या सूर्याखाली
सुखद शीतल सावली
तुझी आठवण,
जशी वेडी श्रावणसर
पाचूंच्या हिरव्या बनात
ओलेतं ऊन उबदार
तुझी आठवण,
वाळवंटातलं मृगजळ
आभसी मायावी
पळते क्षितिजापार
तुझी आठवण,
जसा रातराणीचा सुगंध
रात्रीच्या नीरव शांततेत
बेभान, मंत्रमुग्ध
तुझी आठवण,
जसं कुपीतलं अत्तर
कसं न् केव्हा उडून जातं
पण भिनतो सुगंध नसानसात
तुझी आठवण,
दडवलेला खजिना
पडझड झाली वाड्याची
तरी जाईना आस
तुझी आठवण,
विष जहरी
आयुष्यं होतं बधीर
प्याला नको पुरे एकच घोट ...
- सोनल मोडक
Subscribe to:
Posts (Atom)

