Thursday, May 30, 2019

आपण

स्मरणांचा मौन किनारा,
स्मरणांची ओली गाज

स्मरणांची ओली गाज,
की तुझाच हा आवाज?

हे सारे शाश्वत आहे,
की काळाचा अंदाज?

रेतीवर लिहिले ते ते,
काळाने वाहून नेले

अन् तुझे नी माझे नाते,
अद्वैत होऊनी गेले !!

2 comments:

Vishu said...

Sundar vichar aahet

Unknown said...

Sonal, atishay sunder👌👌